Posts

बदलता काळ !

TIME या नियतकालिकाने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांच्यावर दोन विरुद्ध विचांराचे लेख प्रसिद्ध केले.   निवडणूक शेवटच्या टप्प्यात   आली असताना "मोदी म्हणजे देशाचे विभाजन कर्ते" असा पहिला लेख होता. निवडणुकीतील यशानंतर "मोदी देशाला एकसंध जोडणारे" असा दुसरा लेख होता.   "Time   has changed" असे उपहासात्मक संदेश व्हाट्सअप वर फिरू लागले.   पण तसा विचार केला तर time   म्हणजे काळ खरंच बदलला आहे.    ‘आता काळ बदलला आहे’ हे वाक्य लहानपणापासून कानावर पडत आले आहे. कालानुरूप आपण बदलले पाहिजे हेसुद्धा   तितकेच खरे आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बहुतेक प्रत्येकाला येतो.   पण काही बाबतीत काळ आणि   वेळ हे समानार्थी आहेत.   मला वाटणारा बदललेला काळ म्हणजे घड्याळातील बदललेली वेळ आहे.   तसं पाहिलं तर काळ, काम आणि वेग याच्याशी ओळख आणि नंतर झटापट शाळेत असताना सहावी सातवीत झाली होती.   व्यवहारात त्याचा उपयोग असला तरी तेव्हा गणितातील मार्कांसाठी त्याचा जास्त उपयोग वाटत असे. काळ पुढे सरक...

स्मार्ट सिटी म्हणजे रे काय भाऊ ?

पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून स्मार्ट शहरांची घोषणा करण्यात आली.  यामागील हेतू अतिशय चांगला होता. पण उत्तम कल्पनेचा विचका कसा करायचा याचा हा प्रकल्प एक आदर्श नमुना म्हणता येईल.  पुणे तिथे काय उणे ! तेव्हा पुण्याची स्मार्ट शहरात वर्णी लागली हा खरे तर पुणेकरांचा अपमानच म्हणायचा.   पण त्यानंतर या उपक्रमात जे प्रकल्प पुणेकरांच्या माथी मारले त्यात एक टक्का स्मार्टनेस औषधाला सुद्धा सापडत नाही.   मुळात 'स्मार्ट सिटी'   कशाला म्हणायचे याचीच काही (सं)कल्पना तयार नव्हती.   सरकारातील काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांच्या कल्पनेचा आवाका यथा तथाच असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळे, ‘चला उठा पुणे शहर स्मार्ट करा’ म्हटल्यावर (वर्तमानपत्रातील बातम्यांवरून) असे दिसते कि अनेक दिवस अनेक अधिकाऱ्यांना नक्की काय करायचे हेच लक्षात येत नव्हते. कोणत्याही शहरातील (गावातील किंवा अगदी खेड्यातील) नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून माफक   आणि मूलभूत अपेक्षा असतात. म्हणजे प्रशस्त रस्ते, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा, उद्याने आणि बागा, कचरा व्यवस्थापन, अति...

बीबीसी त्यांची आणि आपली

नव्वदीच्या दशकात भारतात “इलेक्ट्रॉनिक मीडिया” क्रांती झाली. शेकडो चॅनेल्स सुरु झाले आणि त्यातील कित्येक तर फक्त बातम्यांना “वाहून” घेतलेले (म्हणूनंच   वृत्त-“वाहिनी” म्हणत असावेत). कोणतीही बातमी सर्वात आधी द्यायची स्पर्धा यातून सुरु झाली. विविध प्रकारे दर्शकांची संख्या आणि टीआरपी वाढवण्यासाठी 'ब्रेकिंग न्यूज' चा फंडा निघाला. त्याअनुषंगाने चालणाऱ्या चर्चांची गुऱ्हाळे सुरु झाली.   खरे तर स्पर्धेमुळे ग्राहकाला वेगवेगळे पर्याय तर मिळतातच पण   सेवेचा दर्जा उंचावतो. पण असे न होता ब्रेकिंग न्यूज आणि त्यावरील चर्चा हा एक फार्स बनला आहे. टीव्ही वर बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये जगभरात बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन) अग्रणी आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी दिल्लीबाहेर होते. त्यांच्यापर्यंत हत्येविषयी उलट सुलट माहिती जात होती. असं म्हणतात कि त्यावेळी राजीव गांधीनी बीबीसीवरून बातमीची खातरजमा करून   घेतली. अशी विश्वसनीयता आज आपल्याला कोणत्या भारतीय वाहिनीविषयी वाटते ? भारतच काय, पण अमेरिकेत सुद्धा तेथील इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एकेका पक...

वारश्याची वाताहत

वर्तमानातील घटनेवरून भूतकाळात जाऊ लागलो की आपण वृद्धत्वाकडे झुकलो असं समजावं. या न्यायाने मी वृद्धत्वाकडे झुकू लागलो कि काय ही भीती वाटावी अशी बातमी कानावर आली. आर. के . स्टुडिओ मध्ये शेवटचा गणेशोत्सव साजरा झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली हे त्याचे निमित्त. माझीच काय पण त्यामागील किमान दोन पिढ्याना भरून टाकणारे खानदान.... हिंदी चित्रपसृष्टीतील प्रथम कुटुंब (first family) म्हणून मानांकित असणारे "कपूर" घराणे ! त्यांचा स्टुडिओ म्हणजे बॉलीवूडचा चालता बोलता इतिहास. अनेक तारे आणि तारका येथून उगवल्या आणि नंतर वर्षानुवर्षे चंदेरी दुनियेत चमचमत राहिल्या. तो स्टुडिओच आता इतिहासजमा होणार ? 'बॉबी' आला (की आली !) तेव्हा मला   मिसरूड सुद्धा फुटली नव्हती आणि 'राम तेरी गंगा मैली' च्या सुमारास मी हक्काने मित्रांबरोबर सिनेमा पाहू लागलो होतो. थोडक्यात सांगायचे तर माझ्यासारखे अनेक जण आर. के. च्या प्रवाहाबरोबर वाहत मोठे   झालो. पुण्याहून आजोळी मुंबईला जाताना आर. के. स्टुडिओ चा स्टॉप आला म्हणजे आपण मुंबईत शिरलो अशी पक्की खूणगाठ होती. त्याच्या   प्रवेशद्वारावर ते सुप्रसिद्ध युगुला...