Posts

Showing posts with the label मनात सहजपणाने उमटणारे तरंग

वारश्याची वाताहत

वर्तमानातील घटनेवरून भूतकाळात जाऊ लागलो की आपण वृद्धत्वाकडे झुकलो असं समजावं. या न्यायाने मी वृद्धत्वाकडे झुकू लागलो कि काय ही भीती वाटावी अशी बातमी कानावर आली. आर. के . स्टुडिओ मध्ये शेवटचा गणेशोत्सव साजरा झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली हे त्याचे निमित्त. माझीच काय पण त्यामागील किमान दोन पिढ्याना भरून टाकणारे खानदान.... हिंदी चित्रपसृष्टीतील प्रथम कुटुंब (first family) म्हणून मानांकित असणारे "कपूर" घराणे ! त्यांचा स्टुडिओ म्हणजे बॉलीवूडचा चालता बोलता इतिहास. अनेक तारे आणि तारका येथून उगवल्या आणि नंतर वर्षानुवर्षे चंदेरी दुनियेत चमचमत राहिल्या. तो स्टुडिओच आता इतिहासजमा होणार ? 'बॉबी' आला (की आली !) तेव्हा मला   मिसरूड सुद्धा फुटली नव्हती आणि 'राम तेरी गंगा मैली' च्या सुमारास मी हक्काने मित्रांबरोबर सिनेमा पाहू लागलो होतो. थोडक्यात सांगायचे तर माझ्यासारखे अनेक जण आर. के. च्या प्रवाहाबरोबर वाहत मोठे   झालो. पुण्याहून आजोळी मुंबईला जाताना आर. के. स्टुडिओ चा स्टॉप आला म्हणजे आपण मुंबईत शिरलो अशी पक्की खूणगाठ होती. त्याच्या   प्रवेशद्वारावर ते सुप्रसिद्ध युगुला...