Posts

Showing posts from November, 2018

बीबीसी त्यांची आणि आपली

नव्वदीच्या दशकात भारतात “इलेक्ट्रॉनिक मीडिया” क्रांती झाली. शेकडो चॅनेल्स सुरु झाले आणि त्यातील कित्येक तर फक्त बातम्यांना “वाहून” घेतलेले (म्हणूनंच   वृत्त-“वाहिनी” म्हणत असावेत). कोणतीही बातमी सर्वात आधी द्यायची स्पर्धा यातून सुरु झाली. विविध प्रकारे दर्शकांची संख्या आणि टीआरपी वाढवण्यासाठी 'ब्रेकिंग न्यूज' चा फंडा निघाला. त्याअनुषंगाने चालणाऱ्या चर्चांची गुऱ्हाळे सुरु झाली.   खरे तर स्पर्धेमुळे ग्राहकाला वेगवेगळे पर्याय तर मिळतातच पण   सेवेचा दर्जा उंचावतो. पण असे न होता ब्रेकिंग न्यूज आणि त्यावरील चर्चा हा एक फार्स बनला आहे. टीव्ही वर बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये जगभरात बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन) अग्रणी आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी दिल्लीबाहेर होते. त्यांच्यापर्यंत हत्येविषयी उलट सुलट माहिती जात होती. असं म्हणतात कि त्यावेळी राजीव गांधीनी बीबीसीवरून बातमीची खातरजमा करून   घेतली. अशी विश्वसनीयता आज आपल्याला कोणत्या भारतीय वाहिनीविषयी वाटते ? भारतच काय, पण अमेरिकेत सुद्धा तेथील इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एकेका पक...